July 27, 2024 Saturday
July 27, 2024 Saturday
Home » Human Rights News » कोरोना काळात रेल्वेचे सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात
a
Maharashtra has the highest crime rate during the Corona period

कोरोना काळात रेल्वेचे सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात

एकूण २.८४ लाख गुन्हे | राज्यात जवळपास ८० हजार गुन्हे. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्यूरोच्या (एनसीआरबी) ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात रेल्वेशी संबंधित गुन्ह्याचे एकूण ७९,७२३ प्रकरणे दाखल झाली.

कोरोना काळात २०२० मध्ये रेल्वे सेवा मर्यादित करण्यात आल्या होत्या. तरीही देशभरात रेल्वेशी संबंधित २.८४ लाखांपेक्षा अधिक गुन्हे नोंद झाले आहेत. यातील सर्वाधिक जवळपास ८० हजार प्रकरणे महाराष्ट्रात दाखल झाली आहेत. 

राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्यूरोच्या (एनसीआरबी) ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात रेल्वेशी संबंधित गुन्ह्याचे एकूण ७९,७२३ प्रकरणे दाखल झाली. यातील ६८,२१५ रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) आणि ११,५०८ प्रकरणे गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस (जीआरपी) यांनी दाखल केले. 

आरपीएफकडून दाखल एकूण ६८,२१५ प्रकरणात ६८,२७६ लोकांना अटक करण्यात आली. मात्र, केवळ ६५,४६४ प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले. एकूण ६५,९९० लोकांना आरोपी बनविण्यात आले. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सकडून करण्यात आलेल्या कारवाईत एकूण ६४,६४० प्रकरणात एकूण ६४,६८० लोकांविरुद्ध आरोप सिद्ध झाला. या काळात दाखल केलेल्या प्रकरणात ५५ टक्के गुन्हे दखलपात्र होते. 

जीआरपीकडून राज्यात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात ९ प्रकरणे बाल लैंगिक शोषणाचे आहेत. यातील एक प्रकरण अनुसूचित जाती आणि एक अनुसूचित जमातीच्या विरुद्धचे आहे. याशिवाय ५ प्रकरणे हत्या, ३ निष्काळजीपणामुळे मृत्यूचे आहेत. ६ प्रकरणे आत्महत्येचा प्रयत्न, ८ प्रकरणे हत्येचा प्रयत्न आणि ७ प्रकरणे मनुष्यवधाचे आहेत.

Share this Post (शेअर करा)
RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

More News Update Follow Us On Our Social Media

Recent Post

भ्रष्टाचाराला आळा, संविधान कायदेसंरक्षण व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संरक्षण व न्याय मिळवून देण्यासाठी आरटीआय व मानव अधिकार कार्यकर्ते यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केले निवेदन

Read More »

Recent Post

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

भ्रष्टाचाराला आळा, संविधान कायदेसंरक्षण व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संरक्षण व न्याय मिळवून देण्यासाठी आरटीआय व मानव अधिकार कार्यकर्ते यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केले निवेदन

भ्रष्टाचाराला आळा, संविधान कायदेसंरक्षण व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संरक्षण व न्याय मिळवून देण्यासाठी आरटीआय व मानव अधिकार कार्यकर्ते यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केले निवेदन

error: Content is protected !!
Scroll to Top