बेकायदेशीर गोष्टींना आळा घालणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी – राकेश ह. म्हात्रे यांचे आवाहन
RTI TIMES
/ April 21, 2026
दिवसाढवळ्या नियमांचा भंग – शिवाजीनगर अंडरपासमध्ये जेसीबीचा धाडसी प्रवेश..!
RTI TIMES
/ April 9, 2026
BMC रुग्णालयात कंत्राटी कामगारांच्या वेतनात कोट्यवधींचा घोटाळा?
RTI TIMES
/ April 2, 2026
आरटीआय ह्युमन राइट्स ऍक्टिविस्ट असोसिएशन तर्फे कायदेविषयक जनजागृती व प्रशिक्षण कार्यशाळा
RTI TIMES
/ March 14, 2026
KEM रुग्णालयातील साफसफाई कंत्राटात अनियमिततेचा आरोप; RTI माहिती देण्यात दिरंगाईचा मुद्दा ऐरणीवर
RTI TIMES
/ February 4, 2026
आपल्या भागातील लोकप्रतिनिधींच्या कामाचा अहवाल कुठे पाहायचा..?
RTI TIMES
/ January 7, 2026
महाराष्ट्राचं राजकारण : लोकशाहीचा खून, सत्ताधाऱ्यांचा माज आणि जनतेची शरणागती
RTI TIMES
/ January 6, 2026
इटलीत बंद पडलेला विषारी PFAS कारखाना कोकणात? पर्यावरण व आरोग्यावर गंभीर धोका
RTI TIMES
/ December 23, 2025
सरकारी कार्यालयातील ‘भीक’ संस्कृती संपवण्यासाठी नागरिकांनी तक्रार करायलाच हवी
RTI TIMES
/ December 20, 2025
आरटीआय अर्ज केल्यामुळे धमकी मिळत असेल तर सावध रहा – हा गंभीर गुन्हा आहे.!
RTI TIMES
/ December 18, 2025
फक्त दिल्ली नाही… मुंबईची हवा सुद्धा विषारी..!
RTI TIMES
/ December 17, 2025
राजकीय पक्षांना 100% टॅक्स बेनिफिट – काळ्या पैशाचा खेळ आणि लोकशाहीवरील घाव – कामेश घाडी
RTI TIMES
/ December 17, 2025
नाव बदलाची राजकारणे : योजना जनतेसाठी की सत्तेसाठी.?
RTI TIMES
/ December 17, 2025
Latest
Popular
Trending
Latest
शासनाचा वादग्रस्त निर्णय शासकीय कर्मचाऱ्यांची माहिती RTI च्या कक्षेबाहेर
✒️ मुंबई | प्रतिनिधी शासनाने नुकतीच माहिती अधिकार कायदा (RTI Act 2005) अंमलबजावणीतील मोठा बदल…
सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका
सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक…
RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनासाठी १६ जूनला मुंबईत एल्गार; NEET घोटाळा आणि न्यायाधीशांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा जाहीर निषेध
मुंबई, प्रतिनिधी : “आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन” तर्फे दिनांक ११ जून २०२६ रोजी आयोजित…
RMC प्लांटच्या वाहनचालकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे नागरिक त्रस्त; अपघात व साथीच्या रोगांचा धोका वाढला
रेड (ता. शिराळा) येथील नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन; तात्काळ कारवाईची मागणी शिराळा, प्रतिनिधी : शिराळा-ईश्वरपूर राज्य…
Popular
शासनाचा वादग्रस्त निर्णय शासकीय कर्मचाऱ्यांची माहिती RTI च्या कक्षेबाहेर
✒️ मुंबई | प्रतिनिधी शासनाने नुकतीच माहिती अधिकार कायदा (RTI Act 2005) अंमलबजावणीतील मोठा बदल…
सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका
सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक…
RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनासाठी १६ जूनला मुंबईत एल्गार; NEET घोटाळा आणि न्यायाधीशांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा जाहीर निषेध
मुंबई, प्रतिनिधी : “आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन” तर्फे दिनांक ११ जून २०२६ रोजी आयोजित…
RMC प्लांटच्या वाहनचालकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे नागरिक त्रस्त; अपघात व साथीच्या रोगांचा धोका वाढला
रेड (ता. शिराळा) येथील नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन; तात्काळ कारवाईची मागणी शिराळा, प्रतिनिधी : शिराळा-ईश्वरपूर राज्य…
Trending
शासनाचा वादग्रस्त निर्णय शासकीय कर्मचाऱ्यांची माहिती RTI च्या कक्षेबाहेर
✒️ मुंबई | प्रतिनिधी शासनाने नुकतीच माहिती अधिकार कायदा (RTI Act 2005) अंमलबजावणीतील मोठा बदल…
सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका
सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक…
RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनासाठी १६ जूनला मुंबईत एल्गार; NEET घोटाळा आणि न्यायाधीशांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा जाहीर निषेध
मुंबई, प्रतिनिधी : “आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन” तर्फे दिनांक ११ जून २०२६ रोजी आयोजित…
RMC प्लांटच्या वाहनचालकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे नागरिक त्रस्त; अपघात व साथीच्या रोगांचा धोका वाढला
रेड (ता. शिराळा) येथील नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन; तात्काळ कारवाईची मागणी शिराळा, प्रतिनिधी : शिराळा-ईश्वरपूर राज्य…
FEATURED STORY
SINGLE COLUMN POSTS
शासनाचा वादग्रस्त निर्णय शासकीय कर्मचाऱ्यांची माहिती RTI च्या कक्षेबाहेर
✒️ मुंबई | प्रतिनिधी शासनाने नुकतीच माहिती अधिकार कायदा (RTI Act 2005) अंमलबजावणीतील मोठा बदल करणारी अधिसूचना जारी केली आहे. या निर्णयानुसार, शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहिती — जसे की सेवा नोंदी, संपत्तीचा तपशील, रजा, आरोग्यविषयक माहिती — आता RTI अंतर्गत मागवता येणार नाही. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाचा हवाला देत घेतला आहे; मात्र माहिती अधिकार कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संस्थांनी यावर जोरदार आक्षेप नोंदवले आहेत. "हा निर्णय पारदर्शक प्रशासनाच्या संकल्पनेला हरताळ फासणारा आहे," असे मत कामेश घाडी (राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष – आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन) यांनी व्यक्त केले. भ्रष्टाचार लपवण्यासाठी 'गोपनीयतेचा' आडोसा.?माहिती अधिकार कायद्यामुळे हजारो प्रकरणांमध्ये प्रशासनातील गैरव्यवहार उघडकीस आले आहेत. अनेक वेळा कर्मचाऱ्यांच्या मालमत्ता तपशीलांमधून मोठे भ्रष्टाचार समोर आले आहेत. मात्र, हा नवीन निर्णय अशा माहितीची मागणीच रोखतो. त्यामुळे "शासन शासकीय कर्मचाऱ्यांची माहिती का लपवत आहे?" असा सवाल RTI कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. ⚖️ सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ चुकीचा?सर्वोच्च न्यायालयाने काही खाजगी माहितीबाबत वैयक्तिक गोपनीयतेचे समर्थन केले असले तरी, हे सार्वजनिक हिताच्या बाबतीत लागू होत नाही. मात्र शासनाने या निरीक्षणाचा अंशतः आधार घेत, हा निर्णय सर्व कर्मचाऱ्यांवर लादला आहे. हे लोकशाहीच्या तत्त्वांना विरोध करणारे पाऊल ठरत असल्याचे अनेक कायदेतज्ज्ञांनी नमूद केले आहे. RTI संघटनांची एकमुखी मागणी – निर्णय मागे घ्याआरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनसह अनेक संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला असून, तातडीने हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. "शासन पारदर्शक असेल, तर माहिती लपवण्याची गरजच काय?" असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. 📌 महत्वाचे मुद्दे: • RTI कलम 4 आणि 6 नुसार, शासनास सार्वजनिक माहिती देणे बंधनकारक सार्वजनिक निधीतून वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती ‘खाजगी’ कशी? RTI…
सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका
रायगड : सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका पेण तालुका मधील सावरसाई ग्रामपंचयात जवळ होत असलेल्या मोठ्या प्रमाणात प्रदूषणा विषयी पेणच्या सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर यांनी ३०/१२/२०२३ रोजी निवेदन व प्रदूषणाचे पुरावे दिले होते परंतु जानेवारी महिना पर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही त्यानंतर वकीला मार्फत नोटिस देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारचे उत्तर ग्रामपंचायतींनी दिलेले नाही. ०७/०२/२०२४ रोजी माहितिचा कायदा अर्ज दाखल करण्यात आला १ महिना उलटुन सुद्धा कुठलीच माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आलेली नाही. पेण प्रांत व पेण तहसील कार्यालत देखील माहिती अधिकार व तक्रार अर्ज दाखल करून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही तसेच उत्तर हि देण्यात आलेले नाही. माहिती देण्यास टाळाटाळ का होते व हे कोणाचं आशिर्वादाने सुरू असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील १५ दिवसात सदर प्रकारची दखल घेऊन योग्य ती कारवाई न झाल्यास पेण तहसिलदार कार्यालया समोर निषेद करण्यासाठी व कठोर कारवाई होण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर या 3 महिन्याच्या गरोदर असून त्या आपल्या २ वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन आमरण उपोषण करणार व लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये याप्रकरणात मधील दोषी वर कारवाई होण्यासाठी जनहित याचिका दाखल करणार आहे असेल प्रसार माध्यमाशी बोलताना सांगतले.
RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनासाठी १६ जूनला मुंबईत एल्गार; NEET घोटाळा आणि न्यायाधीशांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा जाहीर निषेध
मुंबई, प्रतिनिधी : “आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन” तर्फे दिनांक ११ जून २०२६ रोजी आयोजित पत्रकार परिषदेला पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. १६ जून २०२६ रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या “RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन” संदर्भात ही पत्रकार परिषद घेण्यात आली. साधारण एक तासासाठी नियोजित असलेली पत्रकार परिषद पत्रकारांच्या उत्सुकतेमुळे आणि सखोल चर्चेमुळे तब्बल दोन तासांहून अधिक काळ चालली. RTI संरक्षण, भ्रष्टाचारविरोधी लढा, कार्यकर्त्यांचे संरक्षण, प्रशासनातील पारदर्शकता आणि लोकशाही मूल्यांचे जतन या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. राजेश माकोडे यांनी केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या नवीन RTI अधिनियम २०२६ बाबत सविस्तर माहिती दिली. या नव्या कायद्यामुळे माहिती अधिकाराच्या मूळ उद्देशालाच धक्का बसण्याची भीती व्यक्त करत त्यांनी नागरिक, पत्रकार आणि RTI कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन याला विरोध करण्याचे आवाहन केले. पत्रकार परिषदेत असोसिएशनच्या वतीने जनहिताशी निगडित विविध महत्त्वपूर्ण मागण्या, आगामी आंदोलनाची भूमिका तसेच RTI, भ्रष्टाचारविरोधी लढा आणि सामाजिक न्यायासाठीच्या उपक्रमांची सविस्तर माहिती पत्रकारांसमोर मांडण्यात आली. यावेळी संस्थेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष श्री. कामेश घाडी यांनी अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कथितरीत्या केलेल्या “बेरोजगार तरुण झुरळांसारखे आहेत; ते माध्यम, सोशल मीडिया आणि RTI कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात” या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. हे वक्तव्य देशातील लाखो बेरोजगार युवक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि RTI चळवळीशी संबंधित नागरिकांचा अपमान करणारे असल्याचे सांगत संघटनेतर्फे निषेधाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. तसेच NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटींबाबत संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा…
RMC प्लांटच्या वाहनचालकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे नागरिक त्रस्त; अपघात व साथीच्या रोगांचा धोका वाढला
रेड (ता. शिराळा) येथील नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन; तात्काळ कारवाईची मागणी शिराळा, प्रतिनिधी : शिराळा-ईश्वरपूर राज्य महामार्गालगत रेड गावाजवळील साईटपट्टी परिसरात आरएमसी (RMC) प्लांटच्या वाहनचालकांकडून सर्रासपणे रस्त्याच्या कडेला तसेच गटरांमध्ये कॉंक्रीट टाकले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या बेजबाबदार कृत्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य महामार्गाच्या कडेला आणि दुतर्फा असलेल्या गटरांमध्ये कॉंक्रीट टाकल्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळला जाण्याची भीती आहे. परिणामी सांडपाणी साचून डासांची पैदास वाढण्याची शक्यता असून मलेरिया, डेंग्यू यांसारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रेड गावातील जागरूक युवकांनी शिराळा तहसीलदार यांना निवेदन सादर केले. यावेळी श्री. विक्रम सातपुते, श्री. अरविंद सातपुते, श्री. अक्षय सातपुते यांच्यासह स्थानिक युवक व ग्रामस्थ उपस्थित होते. निवेदनाद्वारे संबंधित वाहनचालकांवर तसेच जबाबदार घटकांवर शासनाच्या नियमांनुसार तात्काळ कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा, सुरक्षिततेचा आणि पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. — प्रतिनिधी, प्रशांत गलुगडे रा. रेड, ता. शिराळा, जि. सांगली
भ्रष्टाचाराविरोधात आरपारची लढाई..! RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन १६ जून रोजी मुंबईत RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन १६ जून रोजी मुंबईत
'आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन'चा एल्गार मुंबई प्रतिनिधी : माहितीचा अधिकार (RTI) आणि मानवाधिकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील वाढते हल्ले, धमक्या, खोटे गुन्हे, मानसिक छळ, तसेच प्रशासनातील वाढता भ्रष्टाचार आणि माहिती मिळविण्यात येणारे अडथळे याविरोधात आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन यांच्या वतीने "RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन" आयोजित करण्यात आले आहे. या जनआंदोलनाच्या माध्यमातून RTI कार्यकर्त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न, मानवाधिकार संरक्षण, माहितीच्या अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी, प्रशासनातील पारदर्शकता तसेच भ्रष्टाचाराविरोधातील लढा अधिक तीव्र करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. असोसिएशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री. कामेश घाडी, राष्ट्रीय सचिव श्री. बसंत चक्रवर्ती, मुंबई अध्यक्ष श्री. सचिन खरात व मुंबई सचिव यांनी आझाद मैदान, पत्रकार परिषद भवन, आझाद मैदान पोलीस स्टेशन तसेच मुंबई महानगरपालिका येथे भेट देऊन आवश्यक पत्रव्यवहार पूर्ण केला असून आंदोलनासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनाची भूमिका, उद्दिष्टे, प्रमुख मागण्या आणि पुढील कार्यक्रम याबाबत माहिती देण्यासाठी ११ जून २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद भवन, आझाद मैदान, मुंबई येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. असोसिएशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री. कामेश घाडी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरीय पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी पत्रकार परिषदेत उपस्थित राहून माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. तसेच १६ जून २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत आझाद मैदान, मुंबई येथे "RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन" आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये RTI कार्यकर्त्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र कायदा, भ्रष्टाचाराविरोधातील प्रभावी उपाययोजना, माहिती आयुक्त कार्यालयातील पारदर्शकता, नागरिकांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण आणि लोकशाही मूल्यांचे जतन यासंदर्भातील विविध मुद्दे मांडण्यात येणार असल्याचे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले. राज्यभरातील RTI कार्यकर्ते, मानवाधिकार…
आरटीआय ह्युमन राइट्स अॅक्टिविस्ट असोसिएशनतर्फे हर्चे, रत्नागिरी येथे भव्य वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती मोहिमेचा उत्साहात शुभारंभ
प्रतिनिधी | रत्नागिरी : भारत सरकारकडे नोंदणीकृत “आरटीआय ह्युमन राइट्स अॅक्टिविस्ट असोसिएशन” तर्फे हर्चे, ता. लांजा, जि. रत्नागिरी येथे भव्य वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती मोहिमेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. कामेश घाडी यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रेरणादायी व समाजोपयोगी उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. आजच्या वाढत्या प्रदूषण, जंगलतोड आणि पर्यावरणीय संकटांचा गांभीर्याने विचार करून संस्थेने यावर्षी “पर्यावरण संरक्षण आणि जनजागृती” हा मुख्य विषय हाती घेतला आहे. त्याअंतर्गत १२ मे ते १५ मे या कालावधीत हर्चे व परिसरात विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आले. मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे : ◾ “एक सदस्य – एक झाड” अभियानया महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत संस्थेच्या देशभरातील प्रत्येक सदस्याला किमान एक झाड लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अभियानातून देशभरात १ लाख वृक्षारोपण करण्याचा निर्धार संस्थेने केला असून, या ऐतिहासिक मोहिमेचा शुभारंभ रत्नागिरी जिल्ह्यातून करण्यात आला. ◾ भव्य वृक्षारोपण मोहीम व पर्यावरण जनजागृती अभियानकोकणातील पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व असलेल्या रत्नागिरी परिसरात प्रस्तावित रिफायनरीसारख्या प्रकल्पांमुळे होणाऱ्या संभाव्य पर्यावरणीय परिणामांबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली. माहितीपूर्ण पोस्टर्स, जनसंपर्क आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून पर्यावरणाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविण्यात आले. ◾ हरित कोकण – सुरक्षित भविष्यग्रामीण भागात हरित पट्टा वाढवणे, जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि नागरिकांना वृक्षसंवर्धनासाठी प्रेरित करणे, हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. 🌿 विशेष आवाहन :या महावृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी झाडे, रोपे किंवा आर्थिक स्वरूपात सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. “आपले छोटेसे योगदानही पर्यावरणासाठी मोठा बदल घडवू शकते.” या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना श्री. कामेश घाडी म्हणाले,"आज झाडे लावणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून भविष्यातील पिढ्यांचे संरक्षण करण्याची काळाची गरज आहे. चला, आपण सर्व मिळून पर्यावरण…
Latest Posts
RTI TIMES
RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society. Please Support Us To Make Our Society Empower And Enlighted.

Human Rights News
RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनासाठी १६ जूनला मुंबईत एल्गार; NEET घोटाळा आणि न्यायाधीशांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा जाहीर निषेध
Read More »
June 12, 2026
No Comments

RTI News
RMC प्लांटच्या वाहनचालकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे नागरिक त्रस्त; अपघात व साथीच्या रोगांचा धोका वाढला
Read More »
June 7, 2026
No Comments








