July 27, 2024 Saturday
July 27, 2024 Saturday
Home » Human Rights News » RTI News » बिनधास्तपणे आता ड्रग्ज घेता येणार! मोदी सरकार आणतंय नवीन कायदा
a

बिनधास्तपणे आता ड्रग्ज घेता येणार! मोदी सरकार आणतंय नवीन कायदा

अमली पदार्थासंदर्भात नवीन कायदा आणणार असल्याची माहिती आहे.

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार (Central Government) संसदेच्या हिवाळी (Parliament Session) अधीवेशनामध्ये अमली पदार्थासंदर्भात नवीन कायदा आणणार असल्याची माहिती आहे. अमली पदार्थासंदर्भातील विधेयक मंजूर झाल्यास अल्प प्रमाणात ड्रग्ज (Drugs) बाळगे हा गुन्हा मानला जाणार नाही, असे सांगितले जात आहे.

नवीन कायद्या संदर्भात दोन आठवड्या पूर्वी पंतप्रधान कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रकरणातील शिफारसींवर निर्णय घेण्यात आला होता. बैठकीला महसूल, गृह विभाग आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, सामाजिक न्याय मंत्रालय व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नार्कोटिक्स ड्रग्ज सायकोट्रॅापिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) विधेयक, २०२१ अंतर्गत, अंमली पदार्थांचे वैयक्तिक सेवन गुन्ह्याच्या कक्षेतून बाहेर ठेवले जाईल. १९८५ च्या कायद्यातील कलम १५, १७, १८, २०, २१ आणि २२मध्ये सुधारणा केल्या जातील, असे सांगितले जात आहे.

या विधेयकात व्यक्तीने ड्रग्ज बाळगणे, खाजगीरित्या सेवन करणे आणि विक्री करणे यात फरक केला जाणार आहे. यामध्ये विक्री करणे हा गुन्हा मानला जाईल, मात्र, अत्यंत कमी प्रमाणात ड्रग्ज बाळगणे आणि वैयक्तिक वापर करणे गुन्ह्याच्या कक्षेत येणार नाही. ड्रग्ज कायद्यात बदल करण्याची मागणी अनेक सेलिब्रिटींनी केली होती.

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण ड्रग्ज प्रकरणात ढवळून निघाले आहे. मुंबई क्रूड ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणी मोठे राजकारण रंगले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्याक मंत्री नवाब मिलक यांनी विविध आरोप करुन एनसीबीचे अधिकारी समिर वानखेडे यांना अडचणीत आणले आहे. या प्रकरणानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्येही वाद रंगला. केंद्र सरकार हे सगळे राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला.

Share this Post (शेअर करा)
RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

More News Update Follow Us On Our Social Media

Recent Post

भ्रष्टाचाराला आळा, संविधान कायदेसंरक्षण व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संरक्षण व न्याय मिळवून देण्यासाठी आरटीआय व मानव अधिकार कार्यकर्ते यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केले निवेदन

Read More »

Recent Post

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

भ्रष्टाचाराला आळा, संविधान कायदेसंरक्षण व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संरक्षण व न्याय मिळवून देण्यासाठी आरटीआय व मानव अधिकार कार्यकर्ते यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केले निवेदन

भ्रष्टाचाराला आळा, संविधान कायदेसंरक्षण व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संरक्षण व न्याय मिळवून देण्यासाठी आरटीआय व मानव अधिकार कार्यकर्ते यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केले निवेदन

error: Content is protected !!
Scroll to Top