प्रशासनाची कार्यक्षमता प्रश्नचिन्हाखाली – नागरिकांचा संताप उसळला
प्रतिनिधी : महेश गवळी छत्रपती संभाजीनगर
शहरातील शिवाजीनगर अंडरपास येथे आज दिवसाढवळ्या अत्यंत धक्कादायक व निष्काळजीपणाचा प्रकार घडला. अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यासाठी प्रशासनाने बसवलेले लोखंडी अडथळे (पोल) तोडून एका जेसीबीने थेट अंडरपासमध्ये प्रवेश केल्याची घटना उघडकीस आली आहे.
◾ प्रशासनाच्या नियमांना जुमानले नाही
सदर अंडरपासमध्ये अवजड वाहनांची वाहतूक रोखण्यासाठी लोखंडी अडथळे बसवण्यात आले होते. मात्र संबंधित जेसीबी चालकाने कोणतीही भीती किंवा जबाबदारी न बाळगता हे सर्व अडथळे तोडून आत प्रवेश केला.
◾ कायद्याचा धाक राहिला का?
ही घटना दिवसाढवळ्या घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “अशा प्रकारे उघडपणे नियमांचे उल्लंघन होत असेल, तर कायद्याचा धाक उरला आहे का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
◾ प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप
या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरक्षेसाठी बसवलेले अडथळे इतक्या सहजपणे तोडले जात असल्याने यंत्रणेच्या दुर्लक्षावर बोट ठेवले जात आहे.
◾ कडक कारवाईची मागणी
स्थानिक नागरिकांनी संबंधित जेसीबी चालक व जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
◾ चौकशीची गरज
या गंभीर प्रकाराची जबाबदारी कोण घेणार? दोषींवर नेमकी काय कारवाई होणार? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.










