April 26, 2024 Friday
April 26, 2024 Friday
Home » Human Rights News » उत्तर प्रदेशात सर्वाधिक मानवाधिकार उल्लंघनाच्या तक्रारी
a
Uttar Pradesh has the highest number of human rights violations

उत्तर प्रदेशात सर्वाधिक मानवाधिकार उल्लंघनाच्या तक्रारी

देशात २०२०-२१ याकाळात मानवाधिकार उल्लंघनाच्या ७४,९६८ तक्रारी नोंद झाल्या असून २०१९-२० मध्ये त्या ७६,६२८ होत्या तर २०१८-१९मध्ये ८९,५८४ इतक्या तक्रारीची नोंद झाली. ३१ऑक्टोबर २०२१ पर्यंत ६४,१७० तक्रारी नोंद झाल्या. त्यापैकी उ. प्रदेशातून सर्वाधिक तक्रारीच्या नोंदी झाल्या.

नवी दिल्लीः गेल्या तीन आर्थिक वर्षांत ३१ ऑक्टोबर २०२१ अखेर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे आलेल्या एकूण मानवाधिकार उल्लंघनाच्या तक्रारीतील ४० टक्के तक्रारी केवळ उत्तर प्रदेश राज्यातून आल्याचे केंद्रीय गृहखात्याने गुरुवारी राज्यसभेत सांगितले.

द्रमुकचे सदस्य एम. षणमुगम यांनी देशात मानवाधिकाराचे उल्लंघन करण्याच्या तक्रारी वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. त्यावर केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग अशा तक्रारीची माहिती एकत्र करत असून त्याची चौकशी सुरू आहे, असे उत्तर दिले. राय यांनी आपल्या उत्तरात काही आकडेवारीही दिली.

त्या नुसार देशात २०२०-२१ याकाळात मानवाधिकार उल्लंघनाच्या ७४,९६८ तक्रारी नोंद झाल्या असून २०१९-२०मध्ये त्या ७६,६२८ होत्या तर २०१८-१९मध्ये ८९,५८४ इतक्या तक्रारीची नोंद झाली. ३१ऑक्टोबर २०२१ पर्यंत ६४,१७० तक्रारी नोंद झाल्या. त्या पैकी उ. प्रदेशातून सर्वाधिक तक्रारीच्या नोंदी झाल्या.

उ. प्रदेशात २०१८-२०१९ मध्ये ४१,९४७, २०१९-२० मध्ये ३२,६९३, २०२०-२०२१मध्ये ३०,१६४ व ३१ ऑक्टोबर २०२१ अखेर २४,२४२ तक्रारी नोंद झाल्या. ही आकडेवारी देशातील एकूण तक्रारीच्या ४० टक्के असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

राजधानी नवी दिल्लीतही मानवाधिकार उल्लंघनाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहे. येथे २०१८-१९मध्ये ६,५६२, २०१९-२०मध्ये ५,८४२, २०२०-२१ मध्ये ६,०६७ व ३१ ऑक्टोबर २०२१ अखेर ४,९७२ इतक्या तक्रारींची नोंद झाली.

Share this Post (शेअर करा)
RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

More News Update Follow Us On Our Social Media

Recent Post

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

Read More »

Recent Post

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

error: Content is protected !!
Scroll to Top