February 5, 2025 Wednesday
February 5, 2025 Wednesday
Home » Health » मेडिक्लेमची रक्कम मिळण्यासाठी रुग्णालयात अ‍ॅडमिट होण्याची गरज नाही; कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
a
There is no need to be admitted to the hospital to get the mediclaim amount; Historic decision of the court

मेडिक्लेमची रक्कम मिळण्यासाठी रुग्णालयात अ‍ॅडमिट होण्याची गरज नाही; कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

Mediclaim Policy: मेडिक्लेमबाबत ग्राहक न्यायालयाने ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. रुग्ण २४ तासापेक्षा कमी कालावधीसाठी रुग्णालयात अ‍ॅडमिट असला तरी तो क्लेमचे पैसे मिळण्यासाठी पात्र ठरतो असे न्यायालयाने म्हटले आहे.

वडोदरा: गुजरातमधील वडोदरा येथील एका ग्राहक न्यायालयाने मेडिक्लेम विम्याच्या एका प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. ग्राहक मंचाने दिलेल्या या निर्णयानुसार मेडिक्लेमची रक्कम मिळण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला रुग्णालयात अ‍ॅडमिट करून घेतले पाहिजे किंवा त्याला २४ तास रुग्णालयात दाखल केले पाहिजे याची गरज नाही. एका प्रकरणात ग्राहक मंचाने मेडिक्लेम करणाऱ्या कंपनीला आदेश दिले की त्यांनी रुग्णाला पैसे द्यावेत.

वडोदरा येथील रमेशचंद्र जोशी यांनी २०१७ मध्ये ग्राहक मंचाकडे नॅशनल इश्योरन्स कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. जोशी यांनी असा दावा केला होता की, त्यांच्या पत्नीला २०१६ मध्ये डर्मेटोमायोसाइटिस झाला होता आणि त्यांना अहमदाबादच्या लाइफकेअर इस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर येथे दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर जोशी यांच्या पत्नीला दुसऱ्याच दिवशी डिस्चार्ज मिळाला.

याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, जोशी यांनी कंपनीकडे ४४ हजार ४६८ रुपयांचे बिल सादर केले. मात्र विमा कंपनीने जोशी यांचा दावा फेटाळून लावला. या प्रकरणी त्यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली. विमा कंपनीने नियमांच्या आधारे जोशी यांचा दावा फेटाळून लावला होता. कंपनीने असे म्हटले होते की, रुग्णाला सलग २४ तास रुग्णालयात दाखल करण्यात आले नव्हते.

Share this Post (शेअर करा)
RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

More News Update Follow Us On Our Social Media

Recent Post

मुख्य जिल्हाधिकारी साहेब मुंबई व मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय यांना आरटीआय ऍक्टिव्हिस्ट असोसिएशन वतीने ऍक्टिव्हिस्ट राष्ट्रीय व उपाध्यक्ष राजेश माकोडे, आणि मुंबई डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट सचिन खरात यांच्याकडून पत्र देण्यात आले.

Read More »

कॅन्सर सारख्या आजरांना कारणीभुत असलेल्या चहाच्या कागदी कपांवर त्वरीत बंदी घालण्याची मागणी आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनचे सोशल मीडिया प्रमुख श्री. सावन ससाणे याच्याकडून करण्यात आली.

Read More »

Recent Post

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

मुख्य जिल्हाधिकारी साहेब मुंबई व मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय यांना आरटीआय ऍक्टिव्हिस्ट असोसिएशन वतीने ऍक्टिव्हिस्ट राष्ट्रीय व उपाध्यक्ष राजेश माकोडे, आणि मुंबई डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट सचिन खरात यांच्याकडून पत्र देण्यात आले.

मुख्य जिल्हाधिकारी साहेब मुंबई व मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय यांना आरटीआय ऍक्टिव्हिस्ट असोसिएशन वतीने ऍक्टिव्हिस्ट राष्ट्रीय व उपाध्यक्ष राजेश माकोडे, आणि मुंबई डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट सचिन खरात यांच्याकडून पत्र देण्यात आले.

कॅन्सर सारख्या आजरांना कारणीभुत असलेल्या चहाच्या कागदी कपांवर त्वरीत बंदी घालण्याची मागणी आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनचे सोशल मीडिया प्रमुख श्री. सावन ससाणे याच्याकडून करण्यात आली.

कॅन्सर सारख्या आजरांना कारणीभुत असलेल्या चहाच्या कागदी कपांवर त्वरीत बंदी घालण्याची मागणी आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनचे सोशल मीडिया प्रमुख श्री. सावन ससाणे याच्याकडून करण्यात आली.

error: Content is protected !!
Scroll to Top