July 27, 2024 Saturday
July 27, 2024 Saturday
Home » Human Rights News » RTI News » मार्च २०२० पासून कोविड संबंधातील माहिती मागितली म्हणून १० आरटीआय कार्यकर्ते मारले गेले आहेत. एकूण ९१ आरटीआय कार्यकर्त्यांचे खून झाले आहेत.
a
Since March 2020, 10 RTI activists have been killed for seeking information about Kovid. A total of 91 RTI activists have been killed.

मार्च २०२० पासून कोविड संबंधातील माहिती मागितली म्हणून १० आरटीआय कार्यकर्ते मारले गेले आहेत. एकूण ९१ आरटीआय कार्यकर्त्यांचे खून झाले आहेत.

NCRB च्या रिपोर्ट प्रमाणे २०२० सालात आपल्या देशात दररोज ८० खून पाडले गेले. २००५ मध्ये आरटीआय कायदा पस झाल्यानंतर ९१ आरटीआय कार्यकर्त्यांचे खून झाले आहेत.

NCRB च्या रिपोर्ट प्रमाणे २०२० सालात आपल्या देशात दररोज ८० खून पाडले गेले, त्यामुळे एक दोन खून हि काही बातमी होत नाही आपल्या देशात पण खालचे प्रकरण वेगळे आहे. त्याचा संबंध अर्थव्यवस्थेशी आहे म्हणून त्याचे अन्वयार्थ लावले पाहिजेत.  मागच्या आठवड्यात अविनाश झा या तरुणाचा बिहारमधील मधुबनी मध्ये खून झाला, त्याच्या आधी काही दिवसापूर्वी बिपीन अग्रवाल या तरुणाचा मोतीहारी बिहार मध्ये दोघेही आरटीआय कार्यकर्ते होते.

२००५ मध्ये आरटीआय कायदा पास झाल्यानंतर ९१ आरटीआय कार्यकर्त्यांचे खून झाले आहेत. ७ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. १७५ जणांवर प्राणघातक हल्ले झाले आहेत तर १८६ जणांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मार्च २०२० पासून कोविड संबंधातील माहिती मागितली म्हणून १० जण मारले गेले आहेत. – (संदर्भ विनिता देशमुख, मनिलाईफ मध्ये)

त्याच आरटीआय कार्यकर्त्यांना टार्गेट केले जातेय जे सहकार, शिक्षण, खाणकाम, जमिनी, रियल इस्टेट कंपन्या, शासकीय लोककल्याणकारी योजना यांच्या संबंधातील माहिती मिळवण्यासाठी पिच्छा पुरवतात इतका कि संबंधितांना ते धोकादायक वाटू लागतात.

जवळपास सर्वच आरटीआय कार्यकर्ते तरुण आहेत. आपल्या देशातील मनमानी, अपारदर्शी पणा याची त्यांना चीड येते आणि ते प्रस्थापितांविरुद्ध “पंगा” घेतात. पण ते सगळे बिगर राजकीय असतात. “अण्णाचा चष्मा” लावून राजकीय अर्थव्यवस्थेकडे बघतात. पण त्या बिचाऱ्यांना हे कळत नाही कि भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई हा व्यापक जनकेंद्री / लोकशाही वादी आर्थिक लढ्याचा भाग असली पाहिजे. कोणाची पर्सनल ट्रिप नाही. त्यामुळे त्यांचे हौतात्म्य कारणी  लागत नाही.

Share this Post (शेअर करा)
RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

More News Update Follow Us On Our Social Media

Recent Post

भ्रष्टाचाराला आळा, संविधान कायदेसंरक्षण व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संरक्षण व न्याय मिळवून देण्यासाठी आरटीआय व मानव अधिकार कार्यकर्ते यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केले निवेदन

Read More »

Recent Post

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

भ्रष्टाचाराला आळा, संविधान कायदेसंरक्षण व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संरक्षण व न्याय मिळवून देण्यासाठी आरटीआय व मानव अधिकार कार्यकर्ते यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केले निवेदन

भ्रष्टाचाराला आळा, संविधान कायदेसंरक्षण व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संरक्षण व न्याय मिळवून देण्यासाठी आरटीआय व मानव अधिकार कार्यकर्ते यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केले निवेदन

error: Content is protected !!
Scroll to Top