December 18, 2025 Thursday
December 18, 2025 Thursday
Home » Blog » Marathi blog » फक्त दिल्ली नाही… मुंबईची हवा सुद्धा विषारी..!
a

फक्त दिल्ली नाही… मुंबईची हवा सुद्धा विषारी..!

प्रतिनिधी मुंबई:

विकासाच्या नावाखाली मुंबईचा श्वास कोंडला जातो.

दिल्लीचं नाव घेतलं की हवा प्रदूषणाचा मुद्दा लगेच समोर येतो. पण आज मुंबईची परिस्थिती वेगळी राहिलेली नाही.
आज मुंबईचा AQI 186 — “Unhealthy” या श्रेणीत आहे.
हा आकडा फक्त आकडा नाही, तो मुंबईकरांच्या फुफ्फुसांवर झालेला थेट हल्ला आहे.

❓ मग प्रश्न असा आहे की
➡️ मुंबईत असं काय घडतंय?
➡️ सरकार, महापालिका नेमकं काय करत आहेत?

झाडे तोड — विकास की विनाश?

मुंबईसारख्या महानगरात
• झाडं म्हणजे फक्त हिरवळ नाही
• ती शहराची ऑक्सिजन फॅक्टरी आहे

पण आज
• मेट्रो
• रस्ते
• बिल्डर प्रोजेक्ट
• कार्पोरेट टॉवर्स

यांच्या नावाखाली लाखो झाडांची कत्तल सुरू आहे.

 महापालिका आणि राज्य सरकार
✔️ झाडं तोडायला तत्पर
❌ पण पर्यावरण वाचवायला उदासीन

एक झाड तोडताना दहा लावतो
हे फक्त कागदावरच उरलं आहे.

उद्योगपतींच्या घशात मुंबईची जमीन

आज मुंबईत जे काही घडतंय, ते पाहिलं की प्रश्न पडतो
➡️ मुंबई कोणासाठी आहे?
सामान्य माणसासाठी की उद्योगपतींसाठी?

• मुंबईतील मोकळ्या जमिनी
• मिठागर
• वनजमिनी
• खुली सार्वजनिक ठिकाणं

• घशात घातली जात आहेत उद्योगपतींच्या

• बिल्डर आणि कॉर्पोरेट लॉबीसाठी नियम वाकवले जातात
• पण सामान्य नागरिकासाठी नियम दगडात कोरलेले असतात

हवा खराब झाली
पाणी दूषित झालं
आरोग्य धोक्यात आलं
➡️ तरीही सरकार गप्प!

नाशिकचा तपोवन — धोक्याचा इशारा

आज नाशिकमधील तपोवन
हा मुंबईसाठी भविष्याचा आरसा आहे.

• नदीपात्रात अतिक्रमण
• वृक्षतोड
• सिमेंट-काँक्रीटचा मारा
• पर्यावरणीय नियमांची पायमल्ली

हे सगळं विकास म्हणून मांडलं गेलं
पण प्रत्यक्षात
• निसर्गाचा घात झाला
•पूरस्थिती निर्माण झाली
•पर्यावरणाचा समतोल बिघडला

आज तपोवन, उद्या मुंबई!

六‍⚕️ आरोग्य कुणासाठी दुय्यम आहे?

AQI वाढतोय
~लहान मुलांचे फुफ्फुस धोक्यात
~वृद्धांचे श्वसनाचे आजार वाढतायत
~ दमा, कॅन्सर, हृदयरोग वाढतायत

पण सरकार कुठे आहे.?

•कोणती ठोस पर्यावरण धोरणं?
•कोणती दीर्घकालीन उपाययोजना?
•कोणती जबाबदारी निश्चित?

उत्तर — शून्य!

वेळ आली आहे प्रश्न विचारण्याची
जर
• विकासामुळे हवा विषारी होत असेल
• झाडं संपत असतील
• जमीन उद्योगपतींच्या घशात जात असेल
• सामान्य माणूस आजारी पडत असेल

तर असा विकास
❌ नको
❌ मान्य नाही
❌ स्वीकारार्ह नाही

• पर्यावरण वाचवणं ही उपकाराची गोष्ट नाही
• ती सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे.

• आज दिल्ली आणि मुंबई दोन्ही ठिकाणी
हवा नाही — विष श्वासात जात आहे.

जर आत्ताच आवाज उठवला नाही
तर उद्या
• मास्क कायमचा चेहऱ्यावर
• ऑक्सिजन विकत घ्यावा लागेल
• आणि सरकार फक्त आकडे सांगत बसेल

• आता तरी जागे व्हा…
• पर्यावरणासाठी लढा…
• कारण हवा विकत घेता येत नाही!

श्री. कामेश घाडी
राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष
आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट सोसिएशन

Share this Post (शेअर करा)
RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

RTI TIMES

RTI TIMES

RTITIMES.COM Is Not Just A News Channel, It's India's First Social Reforming Digital Platform To Fight Against Corruption And To Spread Awareness By Bringing Up The True News And Incidents Which Is Happening In Daily Life.
RTI TIMES Is Awaking Our Society By Putting The True Facts. We Always Fight Against Corruption And Human Rights For Our Society.

More News Update Follow Us On Our Social Media

Recent Post

Recent Post

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

सावरसाई ग्रामपंचायतीचा ढोंगळ कारभार माहिती देण्यासाठी टाळाटाळ लोकांच्या व लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरु सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल करणार जनहित याचिका

error: Content is protected !!
Scroll to Top